Posts

Showing posts with the label Viheer yojna

विहीर अनुदान योजना ....शेतकरी योजना viheer yojna

शेतीसाठी विहीर अनुदान योजना  Viheer yojna  ह्या योजनेसाठी शासनाकडून  मिळवा 4 लाख रुपये अनुदान  राज्यातील बरेचसे शेतकरी हे पैश्याच्या अभावी आपल्या शेतात विहीर खोदण्यासाठी व पाण्याची सुविधा करण्यासाठी असमर्थ आहेत ह्या योजनेच्या माध्यमातून जर शेतात विहीर झाली तर  शेतकरी शेतीला पुरेसे पाणी देवू शकतो व आर्थिक दृष्ट्या संपन्न होवू शकतो . महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगाच्या माध्यमातून शासन शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान देत जाणार आहे. भूजलाच्या सर्वेनुसार  राज्यात अजून 4 लाख विहीर खोदणे शक्य आहे. ह्या विहिरी लवकरात लवकर खोदल्यास आपला शेतकरी राजा सुखी व आनंदी,समाधानी होण्यास खूप मोठी मदत होणार आहे. शेतकरी वर्गाचे दारिद्र्य घालवण्यासाठी व मागेल त्याला विहीर  ( निकषानुसार ) ह्यासाठी ह्या  योजनेचा  शासन निर्णय 4 नोव्हेंबर 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. # लाभधारकाची निवड  या याजनेअंतर्गत खालील प्रवर्गातील अर्जदारासाठी प्राधान्यक्रमाने विहिर मंजुर केली जाईल, असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे. 1.अनुसूचित जाती 2.अनुसूचित जमाती 3.भटक्या जमाती